कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे २२०० रुग्ण उपचार घेत आहेत. मा.पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत कोणतीही दानशूर व्यक्ती किंवा संस्था क्षय रुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र बनून सहा महिने ते एक वर्षापर्यंत पोषण आहार किट देऊ शकते.
कोल्हापूर जिल्हा मधील क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन जिल्हा क्षयमुक्त करण्यास हातभार लावावा असे आवाहन केंद्रीय क्षयरोग विभाग,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय,भारत सरकारचे राष्ट्रीय सल्लागार श्री.धर्मा राव व सहाय्यक संचालक,राज्य क्षयरोग विभाग, महाराष्ट्र राज्य डॉ.दिगंबर कानगुले यांनी गुरुवार दिनांक १३/०६/२०२४ रोजी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकलंगले (मॅक) येथील कै. रामप्रताप झंवर सभागृह येथे आयोजित बैठकीत बोलत होते.
सदर बैठकीमध्ये बोलताना डॉ.राव पुढे म्हणाले की २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करावयाचा आहे. याचाच एक भाग म्हणून क्षयरुग्णांना पोषण आहार किट देणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्ण लवकर बरा होईल. मॅक असोसिएशन अंतर्गत सर्व उद्योग संस्था,कंपनी यांना निक्षयमित्र साठी आपण आवाहन करावे असे सुचित केले.
सदर आवाहनास प्रतिसाद देत मॅक असोसिएशनचे अध्यक्ष श्री.हरिश्चंद्र धोत्रे साहेब, श्री. सुरेश क्षीरसागर साहेब यांनी मॅक चे सर्व सदस्य ऊद्योग संस्था, कंपनी यांना याबाबत माहिती देऊन गरजू रुग्णांना फूड बास्केट देण्याबाबत आवाहन केले जाईल असे आश्वासन सदर बैठकीत दिले.
तसेच मॅक असोसिएशन व जिल्हा क्षयरोग केंद्र तर्फे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील असणार्या कंपनी मधील ऑफिस स्टाफ व कर्मचारी यांची मोफत क्षयरोग व इतर आरोग्य तपासणी बाबत आरोग्य शिबीर लवकरच मॅक येथे आयोजित करू तसेच जिल्हा क्षयमुक्त करण्याबाबत आम्ही नक्कीच प्रयत्न करून अशी ग्वाही मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी सदर बैठकीत दिली.
सदर केंद्रीय पथकाबरोबर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदना वसावे,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव ठाकूर,डॉ. परवेज पटेल, श्री.शिवाजी बर्गे जिल्हा क्षयरोग केंद्राचे विशाल मिरजकर,धनंजय परीट,दिया कोरे,गौरी खैरमोडे, सुनिता नरदगे, पूनम कुंभार,विनोद नायडू,एकनाथ पाटील,एस.टी.एस व एस.टी.एल.एस. कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
