सर्व प्रथम मा. आमदार श्री. अमल महाडीक साहेब यांनी कोल्हापूर मधील उद्योजकांची ओळख करून दिली व कोल्हापूर मधील उद्योग व्यवसाय बाबत माहिती मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे यांनी दिली. तद्नंतर महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पदी मा.ना.सौ.पंकजाताई मुंडे निवड झाल्याबद्दल कोल्हापूर मधील विविध औद्योगिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तद्नंतर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांच्या विविध समस्या खालील प्रमाणे मांडण्यात आल्या.
हरिश्चंद्र धोत्रे -माजी अध्यक्ष व संचालक
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील तसेच इतर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांच्या विविध समस्या खालील प्रमाणे मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे यांच्या समोर मांडल्या व त्या सोडविण्यासाठी विनंती केली.
१. पाणी बिलात मऔविकास महामंडळाकडून Red व Orange Categories उद्योगांना लावणेत येत असलेला पर्यावरण संरक्षण सेवाशुल्क रद्द करणेत यावा.
२. सर्वच उदयोगामधील तसेच मुख्य चौक व इतर रस्त्यालगत असणारा घनकचरा, द्रव्यकचरा व ई-कचरा गोळा करणेकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आठवड्यातून एक दिवस कचरा गाडी औद्योगिक क्षेत्रात फिरविण्यात यावी व कचरा संकलन करण्यात यावा.
३.सर्वच औद्योगिक क्षेत्रामधील निघणार्या कचर्याचे एकत्रित संकलन करणेकरिता प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात भूखंड उपलब्ध करून द्यावात जेणेकरून सदर कचर्याचे नियमांनुसार विलगिकरण करून योग्य ते नियोजन करणे सोईस्कर होईल.
४.औद्योगिक क्षेत्रामधील काही फौंड्री उद्योग घटक यांना Orenge Categories मधून Red Categories मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. सदर उद्योग घटकांना पूर्वीच्या Orenge Categories मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
५.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे उद्योजकांनी उद्योग घटकाचे Consent to Operate करिता Application केले असता त्यास मंजुरीसाठी मुंबई ऑफिस मुख्यालयाकडे पाठविण्यात येते व त्याकरिता बराच वेळ लागतो त्यामुळे सदर Application ला मंजूरी देणेचे अधिकार स्थानिक प्रादेशिक अधिकारी यांना देणेत यावेत जेणेकरून उद्योजकांचा वेळ वाचेल व उद्योग लवकर सुरू करणे सोईचे होईल.
६.पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात राखीव भूखंडावर शतकोटी वृक्ष लागावड करणेबाबत उद्योजकांना सूचित केले जाते व त्याप्रमाणे उद्योजक व संबंधित कार्यालयाकडून खर्च करून वृक्ष लागवड केली जाते परंतु लावलेली झाडे तोडून तो भूखंड विकला जात आहे त्यामुळे वृक्ष लागवड करतेवेळी योग्य असेल तीच जागा सूचित करण्यात यावी जेणेकरून होणारी वृक्षतोड टळेल.
श्री. स्वरूप कदम – गोशिमा -अध्यक्ष
लघु व मध्यम उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून ज्या उद्योग सुरू करणेकरिता एनओसी लागतात त्या त्वरीत देण्यात याव्यात तसेच उद्योजकांच्या असणार्या फौंड्री क्लस्टरला देखील शासनाकडून लागणारे सहकार्य करावेत अशी विनंती केली.
श्री. भरत जाधव – स्मॅक -उपाध्यक्ष
कोल्हापूर मधील उद्योजकांना लागणार्या सोई सुविधा, असणार्या समस्या ह्या शासनाकडून त्वरीत सोडविण्यात याव्यात जेणेकरून रोजगार निर्मिती वाढेल व उद्योगवाढीसाठी त्याचा नक्कीच उद्योजकांना फायदा होईल असे नमूद केले.
श्री. अरुण गोंदकर व श्री. सतीश बुथडा – सीईटीपी असोसिएशन
कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील टेक्स्टाईल इंडस्ट्रीजशी निगडीत असणार्या सीईटीपी बाबतच्या विविध समस्या मांडण्यात आल्या व त्या सोडविण्यासाठी विनंती करण्यात आली.
मा.ना.सौ.पंकजाताई मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री, वरील सर्व विषयाबाबत सविस्तर माहिती घेवून त्या सोडविण्यासाठी नक्कीच मी संबंधित अधिकारी यांना सूचित करेन तसेच पर्यावरणशी निगडीत असणार्या समस्या देखील नक्कीच सोडवू व उद्योजकांना सहकार्य करू अशी ग्वाही मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
सदर बैठकीस मा. आमदार श्री. अमल महाडीक, श्री. उमेश देशमुख, प्रादेशिक अधिकारी, श्री. इराप्पा नाईक, मऔवि महामंडळ, श्री. हजारे, प्रादेशिक अधिकारी, मप्रनि मंडळ, मॅक चे माजी अध्यक्ष व संचालक हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमा अध्यक्ष स्वरूप कदम, स्मॅक उपाध्यक्ष भरत जाधव, मॅक चे ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, स्मक चे ऑन. सेक्रेटरी शेखर कुसाळे, अरुण गोंदकर, सतीश बुथडा, बी.डी. मुतगेकर, सुनिल जाधव आदी मान्यवर उद्योजक उपस्थित होते.

